भारत-पाक युद्ध




भारत-पाक युद्ध झाल्यास भीषण जागतिक दुष्काळ
नवी दिल्ली- भारत- पाकिस्तानदरम्यान सीमित अणुयुद्ध झाले तरी जागतिक दुष्काळ पडून सुमारे एक अब्ज लोकांपेक्षा अधिक लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असे भाकीत “इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्युक्‍लियर वॉर’ या अमेरिकास्थित संस्थेने व्यक्त केले आहे. शिकागो येथे झालेल्या नोबेल पारितोषक विजेत्यांच्या सभेत या संदर्भातला अहवाल जारी करण्यात आला आहे.

या अहवालाच्या लेखिका डॉ. इरा हेल्फॅंड यांनी सांगितले, की संभाव्य युद्ध दक्षिण आशियापुरते मर्यादित राहिले तरी त्यामुळे होणाऱ्या विनाशकारी शस्त्रास्त्रांच्या प्रदूषणामुळे जागतिक तापमानात लक्षणीय बदल होईल. त्यातून चीन, अमेरिका व अन्य देशांतील धान्योत्पादनात मोठी घट होईल. नव्या पुराव्यांनुसार, भारत व पाकिस्तानकडे सीमित अण्वस्त्रे आहेत; मात्र, अशा युद्धाचे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर गंभीर व दूरगामी परिणाम होऊन कुपोषणाचे बळी ठरलेल्यांवर आकाश कोसळेल.

एक अब्ज लोकांचा मृत्यू, हे मानव जातीवरील सर्वांत मोठे संकट असेल. मानवजातीची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू होऊन आधुनिक संस्कृतीचा विनाश होईल, अशी भीतीही हेल्फॅंड यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अहवालातील तपशील “क्‍लायमेट चेंज’ नियतकालिकातही प्रसिद्ध केले जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय साठेबाजीची भीती
अध्ययनात असे दिसून आले, की युद्धानंतर दहा वर्षांत अमेरिकेतील मका व सोयाबीनचे उत्पादन सरासरी प्रत्येकी दहा टक्‍क्‍यांनी घटेल. त्याचप्रमाणे चीनमधील तांदळाचे उत्पादन पहिल्या चार वर्षांत 21 टक्‍क्‍यांनी व पुढील सहा वर्षांत दहा टक्‍क्‍यांनी घटेल. परिणामतः निर्माण होणाऱ्या धान्य तुटवड्याने सर्वत्र भयगंड निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय साठेबाजी झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील.                   – सकाळ न्यूज नेटवर्क

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड