पानगळ….. आता याविषयी लिहिण्यास एक प्रसंग कारणीभूत ठरला….. असाच सकाळी लायब्ररी पासून खोलीच्या दिशेने जात होतो…अचानक खूप पाने रस्त्यावर पडलेली दिसली….एरवी ती असतात नेहमीच…पण यावेळेस काहीशी वेगळी भासत होती….माझ्या मनाला पडलेला प्रश्न नेहमीचा….एकेक पान गळत असताना देखील….खंबीरपणे उभा असलेला तो वृक्ष…..निसर्ग देतो नेतो….परत देतो….हे चक्र चालायचे….माणसाचे देखील असेच होते का….?
होय…..लहानपणी आपल्याला केस नसतात…. हळू हळू ते येतात….कालांतराने मोठे होतात…. एका ठराविक वयानंतर ते जातात….याविषयी संकर्षण कऱ्हाडेंच्या कवितेतील एक ओळ मनाला खूप भावली…..जे निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्यात काय लाजायाचं…?
वसंत , ग्रीष्म, हेमंत,शिशिर हे ऋतुचक्र आणि पानगळीच्या ठराविक तऱ्हा…….वसंत आला की येतो बहर…..शिशिर करतो नुसताच कहर…..पण त्या झाडाला माहित असत…..कितीही कठीण परिस्थिती मध्ये उभा राहणे…..जीव त्याच्यात देखील आहे…..
विज्ञानाला साहित्याची जोड मिळाली आणि मला पण पानगळीवर काहीसे लिहू वाटले……..
पानगळ
पानगळीच्या नाना तऱ्हा
निसटून एकेक पान धरा
वसंत आला की येतो बहर
शिशिर करतो नुसताच कहर
सोडावे कधीतरी थोडेसे
मिळेल तेव्हाच पुरेसे
निसर्गाचा नियम पाळून
उभारेल मीही नव्याने गेले जरी एकेक पान गळून
विचार करताच मी पण झालो शांत
येईल का आधी होता तसाच वसंत
विचारांनी माझ्या मी गुरफटलो हवी थोडीशी उसंत
विचारांचा प्रवास आहे मला तितकाच पसंत
The Last leaf वाचत असताना
त्यातल्या कलाकाराला मी सलाम केला
निर्मितीत पण ताकत असते असा विचार मनात आला
निर्मिती मग ती नैसर्गिक असो की मानवी
त्यात जीव ओतून ती अजरामर करावी
बस एकच खूणगाठ मनाशी धरावी
आनंद वाटावा सतत दुःख मागे सारावी
- -डॉ.ओंकार भाकरे
- 9284701235
- omkarbhakre14@gmail.com
- Flat no 102 D Wing Venkateshwara Apartment Pharande Park Wadi BK Nanded












