हरिश्चंद्रगड (Harishchandragad)




हरिश्चंद्रगड

इतिहास
हा किल्ला अगदी प्राचीन आहे. मायक्रोलिथिक माणसाचे अवशेष येथे सापडले आहेत. विविध पुराण (प्राचीन ग्रंथ) मत्स्य पुराण अग्निपुराण स्कंधपुराणात हरिश्चंद्र गढीविषयी अनेक उल्लेख आहेत. कालाचुरी घराण्याच्या कारकिर्दीत त्याचे मूळ 6th व्या शतकात होते असे म्हणतात. या काळी किल्ले बांधले गेले. बहुधा 11 व्या शतकातील विविध लेण्या खोदण्यात आल्या आहेत. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. जरी त्या खडकांना तारमती आणि रोहिदास असे नाव दिले गेले असले तरी ते अयोध्याशी संबंधित नाहीत. महान Chanषी चांगदेव (ज्याने महाकाव्य तत्व निर्माण केले आहे), याचा उपयोग 14 व्या शतकात चिंतन करण्यासाठी केला. गडावर विविध बांधकामांची कामे झाली आणि येथील विविध संस्कृतींच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. नागेश्वर (खिरेश्वर गावात) मंदिरात, हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत कोरलेल्या चिन्हे आहेत.हा किल्ला मध्ययुगीन काळाचा आहे,कारण तो शैव,शक्ती किंवा नाथ यांच्याशी संबंधित आहे.पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता.1747 मध्ये मराठ्यांनी हा कब्जा केला.हरिश्चंद्रगडाची निर्मिती ५व्या किंव्या ६ व्या शतकातील त्रेकुटक अगर कलचुरी या राजघरान्यांच्या काळात झाली असावी असे इतिहासकार सांगतात.गडाविषयी हे झाले पण हरिश्चंद्र पर्वत हा फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. काशीपुरानात, अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात याचा उल्लेख १६७०-७१ च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला असे म्हणतात,याचा कुठे उल्लेख मला तरी सापडला नाही परंतु महाराज एकदा शेजारीच असलेल्या कुंजरगडावर विश्रामाला थांबताय (याचे साल देखील १६७० आहे) तर हा गड सुरक्षितच असणार असा अंदाज बांधून हे सांगितले जाते. हा गड मोगलांच्या ताब्यात होता, जवळपास १६८८ ते १७४७ अशा भव्य मोगल राजवटी नंतर मराठ्यांनी पेशवाईत १७४७ मध्ये जिंकला.१७५१ मध्ये गडावरचा कारभार हा माहुली किल्ल्याचे किल्लेदार कर्नाजी शिंदे यांनी गडावर डागडुजीची कामे केली. यानंतर किल्याचा शेवटचा मराठी किल्लेदार हा हरिश्चंद्रगडकर जोशी १८१८ मध्ये कर्नल साईक्स सोबत लढताना वीरमरण आले. याच कर्नल ने १८३५ मध्ये सर्वात प्रथम कोकणकड्यावरून संपूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य म्हणजेच पहिले इंद्रवज्र पहिले होते अशी नोंद आहे. चांगदेवांच्या तत्वसार ग्रंथाच्या १०३६ ओव्यांपैकी ४०४ ओव्या हाती लागल्या आहेत. त्यातील एका ओवीत या गडाचा उल्लेख आहे.

पंढरीचा पांडुरंग जसा वारकऱ्यांच्या मनाला दर आषाढीला साद घालतो तसाच सह्याद्रीच्या कुशीतील हरिश्चंद्रगड म्हणजे तुम्हा आम्हा भटक्यांची जणू पंढरीच. आपल्या देखील या पांडुरंगाच्या वाऱ्या झाल्या असतील. पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला किल्ला. तारामती, रोहिदास आणि हरिश्चंद्र या पुराण कथातील पात्रांची नावे असलेले उंचच उंच शिखरे, केदारेश्वराच्या गुहेतील भव्य दिव्य शिवलिंगाची थंड पाण्यातून केलेली प्रदक्षिणा, भव्य वक्राकार कोकणकडा आणि नशिबात असेल तर दिसणारा इंद्रवज्र काय हवं असत याशिवाय भटक्यांना.

खिरेश्वर गावातून :

सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते . या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड  माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे . खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर , ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते . या वाटा गावातून दोन गडावर जातात . अ ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते . टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते . ब ) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे . ही वाट पूर्वी प्रचलित होती . आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये . या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो . या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे , कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही .

खिरेश्वर मधील नागेश्वर महादेवाचे मंदिर-
खिरेश्वर गावातील आश्रमशाळेजवळ नागेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे.  यादवकालीन या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील पट्टीवर शेषशाही भगवान विष्णू चे अत्यंत मोहक शिल्प बघायला मिळते. बाहेर मंडपाच्या छताला सोळा कोरीव कामांतून प्रसंग म्हणजेच शिल्पपट आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड