For more information read following article.

भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याला तसेच जपायचे आहे.
आपण शेती करतो पृथ्वीची झीज होते. पृथ्वी आपल्यासाठी झिजून आपणास धान्य देते. तेव्हा तिचा कस,तिचे सत्व कमी होते.आपण तिची झीज भरून काढायलाच पाहिजे. आपण तिला नांगरून ठेवतो. सूर्याची उष्णता तिच्या आंत शिरते, आपण तिच्यात खत घालतो, या नुसार तिचा कस भरून काढत असतोच. असेच आपण पृथ्वीसाठी तिचा कस कमी होऊ नये म्हणून तिला, उन्हात उभे राहून नागरतो, पैसे खर्च करून खतपाणी घालतो,हि शारीरिक व आर्थिक झीज आपण तिच्यासाठी केली तर ती उत्कृष्ट पीक देऊन त्याची भरपाई करतेच, तेव्हा ती आपल्यासाठी झिजते व आपण तिच्यासाठी झिजायलाच पाहिजे. असे आपण केले नाही तर आपणच एक दिवस दुखी होऊ.एकमेकांसाठी झीज हि सोसावीच लागते. पृथ्वी व शेतकरी हे दोघेही परस्परांची झिजतात. त्याच प्रमाणे मालकांनी मजुरांसाठी व मजुराने मालकांसाठी त्याग प्रवृत्तीचा अवलंब केला पाहिजे त्यायोगे समाजात समता व आनंद राहील. एकमेकांसाठी झटले तरच आजचा मानव सुखी होऊ शकेल.













1 Comment. Leave new
भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याला तसेच जपायचे आहे