आपण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे!




If you want to change the today’s scenario, so we need to change our view to see women. to need to find a Mother, a Sister in Women. we must have to give respect to the women.

Our view towards women should be changed!आजची परिस्थिती सुधारावयास हवी असेल तर आपण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपल्याला स्त्री मध्ये आई, बहिण, मुलगी, वहिनी दिसावयास हवी. ही पवित्र नाती आहेत. या नात्यामधून कुठल्याही स्त्रीकडे पाहा, हवं तर ओळख काढून बोला, जरूर प्रेम करा. कुठलीही स्त्री या नात्यातील प्रेमाचा स्वीकार करेल यांत शंका घेण्याचे कारण नाही. एक लक्षत घ्या आपली पत्नी ही आपलीच पत्नी असते. एका क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते याचा विसर पडावयास नको. या विषयावर मी अनेकदा माझे विचार मांडले आहेत, आजही मी माझ्या वयानुसार, माझ्या वयाच्या स्त्रीकडे बहिण म्हणून पाहतो, माझ्यापेक्षा जर एखादी स्त्री लहान असेल तर मी तिच्याकडे वहिनी किंवा अगदीच माझ्या मुलींच्या वयाची असेल तर मुलगी मानतो. माझ्या वयाहून जर का एखादी स्त्री मोठी असेल तर तिला आई किंवा बहिण मानतो.

या पवित्र – निर्मल नात्यातून पहिल्या कारणाने मला आई, बहिण, मुलगी, वहिनी मिळालेल्या आहेत. निर्मल – पवित्र नातं निर्माण करण्यासाठी मोठं मन लागतं. असं मन प्रत्येकाकडे आहे. पण बघण्याचा दृष्टीकोन नाहीये. मात्र आता निकोप दृष्टीकोन असणे गरजेचे असल्याने प्रत्येकांनी बदलला पाहिजे असं माझं एक प्रांजळ मत आहे. आजच्या तरुण पिढीला कदाचित माझे हे विचार पटणार नाहीत, हे जरी खरं असलं, तरीही काही कालावधी गेल्यानंतर निश्चितपणे माझी मते त्यांना पटावयास लागतील. तेव्हढी समाज नक्की त्यांना येईल. आज नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा एकाच दिवशी आहेत. दोन्ही सन आपल्याला आनंदाने, समाधानाने साजरे करावयाचे आहेत. मात्र बहिणींना भावाला राखी बांधावयाची असल्याने योग्य काळ दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानंतर आहे याची कृपया माझ्या बहिणींनी नोंद घ्यावी. माझ्या मनातील विचार आपल्यासमोर मांडले आहेत जरूर विचार करावा असं मला वाटतं. नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. हरी ओम.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




1 Comment. Leave new

  • नवनाथ बोंद्रे
    04/03/2016 6:25 AM

    सर मला तुमचे म्हणणे १००% पटतंय,पण महिलांनी ही त्यांच्या मर्यादेन वागले पाहिजे.त्यांची राहणीमान बोलणे चालणे
    सगळे व्यवस्तीत असायला पाहिजे.नाहीतरी आजच्या कॉलेजच्या मुली आपण बघतो त्याचं बोलन वागणं एक वेळेस माणूस लाजतो पण त्यांना काही वाटत नाही.तुम्हीच सांगा नजाराच जर तसा असेल तर नजर कशी बदलेल आधी हा नजारा नीट असला पाहिजे मग बरोबर नजरा बदलतील.धन्यवाद.

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड