राज ठाकरेंची आबांवर सडकून टीका




Like
Like Love Haha Wow Sad Angry

राज ठाकरेंची आबांवर सडकून टीका

 

राज ठाकरे पुन्हा मैदानात :
आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात. जेवढे जास्त बॉक्स जातील तेवढी लाज वाटून तरी ते राजीनामा देतील, असा सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली
काल मुंबईत एका प्रशिणार्थी महिला पत्रकारावर सामुहीक बलात्कार झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांना माझे आवाहन आहे, महाराष्ट्रातील जनतेला माझे आवाहन आहे. आज व्यक्ती बदलणं गरजेचं आहे, उद्या सरकार बदलणं गरजचं आहे. परंतु, ही व्यक्ती आत्ताच बदलणं गरजेचं आहे. त्या शिवाय हे वठणीवर येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचा रेटा जोपर्यंत यांच्या मागे लागणार नाही तो पर्यंत यांना काही वाटणार नाही. हे रोजचं आहे, तुम्ही जगा किंवा मरा याचं काही देणं घेणं नाही. निवडणुकीच्या दिवसापर्यंत जीवंत राहा. मतदान केल्या केल्या मेलात तरी चालेल. असल्या वृत्तीची माणसं संपूर्ण महाराष्ट्र चालवत आहे. लाज वाटते आज. दाभोलकरांसारखी व्यक्ती गेली आज बलात्कार उद्या काय होईल सांगता येत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu