Pitrudevanche shradhapaksha, This article gives you information on shradha and how to celebrate shradha paksha. read full information on shradhha.
त्रिपिंडी श्राद्ध परिचय व महत्व [पितृदेवांचे श्राद्धपक्ष]
संसार मध्ये जन्म घेतला कि त्याला मृत्यू निश्चितच आहे, हे सत्य सर्वांच्या परिचित आहे, आणि पुनर्जन्म हा सुद्धा बर्याच योनीत होतो, सामान्यत: जीवनात पाप-पुण्य दोन्ही होतात. पुण्यचे फळ स्वर्ग व पापांचा नर्क असे म्हटल्या जाते. नरकात पापिंना यातना भोगाव्या लागतात तर पुन्यात्म्यांना स्वर्गात सुख प्राप्त होते असे म्हणतात. आणि त्याही नंतर जीव आपल्या कर्मानुसार चौर्यांशी लक्ष योनीत भटकत असतों असे शास्त्र सांगते. पुण्यात्मा मनुष्य योनीत व पापात्मा कीटक, पशु, पक्षी प्राप्त करते असे म्हणतात.पण तेही आपापल्या कर्मा नुसार मिळतात आणि तिसरी योनी म्हणजे भूत, प्रेत, पिशाच्य हि होय. परंतु हि योनी म्हणजे असद्गती प्रकारची होय, आत्महत्या, ऋणानुबंध, दुसर्यांची हत्या करणे, दुरघटना, अकाल मृत्यू या कारणांनी किंवा ज्यांचे औध्व्रदैहिक संस्कार शास्त्रविधी नुसार केल्या जात नाही त्यांना हि योनी प्राप्त होते. या योनी मध्ये प्राणी स्वत:तर भूक-तहानेने व्याकुळ होऊन अत्यंत यातना भोगतो, पण यासोबत दुसर्यानाही अनेक प्रकारची शारीरिक, मानसिक, व संतान ई. विवशता पूर्वक उपद्रवाने ग्रस्त करतो. हे भूत-प्रेत प्राणी अतृप्त होऊन द्युलोक, अंतरीक्ष व पृथ्वी लोकांत वायूरूपांत भ्रमण करतात. कधी कधी आपल्या कुळांतील किवा अन्य प्राण्यातील वंशपरंप्रांत उत्पन्न जीवांना त्यांच्या द्वेषा बाबत व धन संपत्ती बाबत फार कष्ट पोचवितात. यालाच प्रेतबाधा किंवा पितृबाधा म्हटल्या जाते. या करीता पितृदेव श्राद्ध किंवा त्रिपिंडी श्राद्ध करणे आवश्यक मानल्या जाते.
या उलट याचा वासनामय कोश त्या मानाने शुद्ध म्हणावा लागेल. त्यातील वासनांची अशुद्धता साक्षात व्यक्त होत नाही. कारण अन्नमय कोशाखेरीज अन्य सर्व कोश हवे पेक्षा विरळ व तरल असतात. मानवाचे मरण घडताच त्याचा आत्मा पंचमहा भौतिक देहास सोडून जातो. पण तो आपल्या बरोबर प्राणमयादी सर्व कोशांचे गाठोडे घेऊन जातो.काही वेळाने हे गाठोडे विस्कटून प्राणमय कोश विरून जातो, व वासनामय मनोमय ई. कोशांचा संधटीत प्रवास चालू होतो. अश्या वेळी पूर्वाअवस्थेच्या घटना नाती ई. चे सर्व संस्कार त्या कोशांवर असतात.पार्थिव नेत्र असले तरी त्याच्या ठायी सूक्ष्म चक्षुरीन्द्रीय असल्यामुळे त्याला वासना लोकातील सर्व दृश्ये गोचर होतात. जिवंत व्यक्तीही त्याला दिसते.पण ती वासनांमय कोशातच दृगोचर होते.मृत व्यक्तीला त्याचे जिवंत नातेवाईक, मित्रमंडळी, व अन्य सर्व पशुप्राणी जिवंत दिसतात. पण त्याचे दिसणे वासनांमय कोशात्मक असते. संबन्धीतांनी मृत व्यक्तीला उद्देशून केलेल्या सर्व चांगल्या वाईट क्रियांची जाणीव संबंधित मृत व्यक्तीला होत असते. श्राद्ध हि अशीच एक क्रिया आहे. श्राद्ध चालू असताना मृत व्यक्तीचा आत्मा वासनांमय कोशाने तेथे उपस्थित असतो, विशेष म्हणजे त्याच्या निधन तिथीच्या दिवशी त्याला आपल्या पुर्वावस्थेतील घराची व नातलगांची प्रकर्षाने आठवण होते पहिल्या वर्षी तर दर महिन्याच्या त्या तीथिला त्यास आठवण येते. पुढे काळ मर्यादा वाढत जाते.म्हणून प्रथम वर्षी दर महिन्यास मासिक श्राद्ध करण्याची शास्त्राज्ञां आहे. त्यानंतर प्रती वार्षिक श्राद्ध केले जाते.
मृत व्यक्तीला परलोक वासाची सवय होऊन पूर्वावस्थेतील आपतेष्ठांची ममता कमी होण्यासाठी किमान वर्ष भराचा अवधी लागतो. म्हणून प्रथम वर्षी मृत व्यक्तीला ‘प्रेत’ अशी संज्ञां असते. नंतर त्याचा कोशात्मक शरीरात बदल होऊन त्याची तरलता वाढल्यावर त्यास वर्ष्या नंतर ‘पितृ’ हि संज्ञां लाभते.प्रथम वर्षीय श्राद्ध झाल्यावर पुढची सर्व श्राद्धे पितरांस उद्देशून असतात. खरे पाहता त्याच वेळी सपिंडी करण करणे योग्य ठरते. पण हल्ली वेळेच्या अभावी सपिंडी करण, मासिक श्राद्धे, वै.सर्व गोष्टी निधनाच्या बाराव्या किंवा तेराव्या दिवशीच ‘उरकून’ घेण्यात येतात. श्राद्धाच्या वेळी उच्चार केल्या जाणार्या तीन देवतांनाही अवस्थातराच्या दृष्टीने अपार महत्व आहे. ज्याला उद्देशून श्राद्ध करावयाचे त्याची वसूगणांत गणना होते, त्याच्या पित्याची रुद्र्गणात गणना होते.व आजोबाची आदित्यगणांत होते. अष्टवसू, एकादशरुद्र, आणि द्वादशादित्य अश्या एकतीस देवता आहे. त्यांची संख्याही तितकीच अन्वर्थक आहे. म्हणून श्राद्धाचे वेळी वसू -रुद्र-आदित्य यांचे प्रतिनिधी म्हणून पिता-पितामह- प्रपितामह यांचा उच्चार करतात.
ज्या घरात नियमित श्राद्ध होतात तेथे सहसा अशांती दिसत नाही. कारण तेथे अल्प काळ का होईना पितरांचा वास असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद, सदिच्छा तेथे असतात ज्या घरात श्राद्धे होत नाही. तेथील वातावरण चीड्चीडीचे असते, किंवा तेथे दीर्घ काळ रेंगाळणारे आजार असतात. काही वेळा घरातील व्यक्तींवर व्यसनांचा अतिरिक्त प्रभाव होतो. यासर्व गोष्टीना प्रतिबंध होण्यासाठी देवांची कृपा जितकी आवश्यक आहे त्या हूनही अधिक प्रमाणात पितरांची कृपा आवश्यक असते. यास्तव श्राद्ध कर्मास पर्याय असू शकत नाही श्राद्ध करणार्या व्यक्तीच्या घरात स्वयंपाक करणारी एकच स्त्री असेल तर ती रजस्वला झाल्यास त्या बाबत दोन शिष्टसमंत पर्याय असून दोन्ही पर्याय प्रचलित आहेत. एका पर्यायाने श्राद्ध तिथी हा मुख्य काळ ओलांडू नये म्हणून त्या दिवशी अन्ना एवजी शिधा देऊन श्राद्ध करावे. दुसर्या पर्यायाने मुख्य काळ ओलांडला तरी हरकत नाही. पण पितरांना अन्न देण्याच्या दृष्टीने रजोनिवृत्ती झाल्यावर [म्हणजे पाचव्या दिवशी] श्राद्ध करावे, मुलगा नसलेल्या स्त्रीने स्वत: श्राद्ध करणे झाल्यास रजोकाळात दुसर्या कडून श्राद्ध करण्या एवजी सरळ पाचव्या दिवशी श्राद्ध करावे.
पितृ पक्ष कोणत्या कर्मात निषिद करावे? पितृपक्ष पंध्रवडा म्हणजे भाद्रपदाचा वद्य पक्ष होय, भाद्रपद वद्य प्रतीपदे पासून महालयास प्रारंभ होतो. पण भाद्रपद अमावस्येला महालयाची समाप्ती होत नाही. म्हाल्याची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्र्चीकेला गेल्यावरच होतो. म्हणून अशुभ किंवा निषिद्ध मानवयाचा असेल तर म्हाल्याचा जवळ जवळ दोन महिन्याचा कालावधी तसा मानावा लागेल. पंधरवड्यात विवाह मुहूर्त नसतात हि गोष्ट खरी आहे. पण संपूर्ण चातुर्मासातच विवाह मुहूर्त असत नाही. मग पंधरवड्यात कुठून असणार? म्हणून आपल्या सोयी नुसार विवाहाची प्राथमिक तयारी साठी पंध्रवडा आड येत नाही, पक्ष पंध्रव ड्याचा दुरंवयाने संबंध पिशाच्ये ई. पापयोनीशी लावला जातो.पण परिस्थिती अगदी उलट असते.
निधन झालेल्या व्यक्तीची प्रेत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्या मुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही. प्रेतत्व स्थितीत असणार्या व्यक्तींना स्थान नदेणार्या महालयाचा प्रेत योनिशी संबंध जोडून काहीतरी तर्कट रचणे हे अत्यंत कोत्या बुद्धीचे धोतक म्हणावे लागेल. पक्षपंध्रवड्यात विवाह, नैमित्तिक पूजा ई. गोष्टी केल्या जात नाही. येथ पर्यंत ठीक आहे, पण काही अंधश्रद्ध लोक या काळात नेहमीची कामे देखील लांबणीवर टाकतात. अत्यवश्यक साहित्य खरेदी करीत नाही. कोणी प्रवास देखील टाळतात. या सर्व गोष्टीन मागे समाजातील अत्यंत चुकीच्या व घातक प्रथा आहे. या प्रथा पडण्या मागे थोडी भौगोलिक परिथिती कारणीभूत आहे, नुकताच पावसाला संपुन उन्हाचा तडाखा लागल्या मुळे हवामानात लक्षणीय बदल होऊन विषमज्वर, ताप यासारख्या साथीच्या आजाराचा फैलाव झालेला असतो. काही धूर्त लोक या आजारांचा पितृगनाशी संबंध लाऊन पितृ पंध्रवडा अशुभ व निषिद्ध मानतात. आणि ईतर लोक त्यांचे अनुकरण करतात.
श्राद्ध करणे असंभव असल्यास शास्त्रात काही अनुकल्प दिलेले आहेत?
सर्व प्रथम म्हणजे मनात पित्रान विषयी श्रद्धा असली पाहिजेत. त्या नंतरच अनुकल्पांचा अवश्य अवलंब करावा.ज्यावेळी सपिंडश्राद्ध [ब्राम्हणांच्या भोजनोत्तर पिंडपुजा करून केलेले श्राद्ध] करणे अशक्य असेल तेव्हा * ब्रम्हार्रपण [ब्रम्हास अर्पण करण्याच्या बुद्धीने केलेले पिंड रहित श्राद्ध] विधीने करावे. * हस्त श्राद्ध [शिजलेल्या अन्नाने करण्यात येणारे श्राद्ध] तेही अशक्य असल्यास. * आम [शिधा ]श्राद्ध करावे. आमान्न देणे अशक्य असल्यास * हिरण्य श्राद्ध [ केवळ दक्षिणा देऊन केलेले श्राद्ध ]करावे. श्राद्धात अनेक ब्राम्हण मिळणे अशक्य असल्यास एक ब्राम्हण पितृ स्थानावर बसवावा. व देव स्थानावर गोपालकृष्णाची मूर्ती ठेवावी, एकही ब्राम्हण उपलब्ध नसेल तर तेव्हा देवस्थानावर गोपालकृष्णाची मूर्ती ठेऊन पितृ स्थानावर दर्भबटू ठेवावा. किंवा दोन्ही स्थानावर दर्भबटू ठेवावे. दर्भबटू म्हणजे चट होत. याला चट श्राद्ध म्हणतात. हल्ली चट श्राद्धाचा विधी सांगणारे पुरोहित देखील उपलब्ध होत नाही अश्या वेळी मिळेल त्या ब्राम्ह्नास दुध,केली, दक्षिणा द्यावीत. किंवा मंदिरात जाऊन पितरांचे स्मरण करून देवास दक्षिणा अर्पण करावी. जे हेही शक्य नसल्यास गायीस गवत ध्यावे व पितरांच्या नावाने तीलतर्पण करावे. स्वत:ला श्राद्ध प्रयोग म्हणता येत असेल तर तो म्हणावा. अगदी काहीच शक्य झाले नाही तर घरां बाहेर येऊन दक्षिण दिशेकडे तोंड करावे व पुढील प्रार्थना म्हणावी, ” न मे अस्ति वित्तं न धनं न चान्यत श्राद्धोपयोगी स्वपितृन नतो $ स्मि | तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैते भुजौ कृतौ वतर्मनि मारूतस्य || ”या प्रार्थनेचा अर्थ असा कि ( माझ्या जवळ द्रव्य नाही, धन नाही आणि श्राद्धास उपयुक्त अश्या वस्तूही नाहीत.पण मी मनोभावे आपल्या पितरांना नमस्कार करीत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर संतुष्ट होवोत.या साठी मी वारयाच्या दिशेने माझे दोन्ही हात वर केलेले आहेत.) हा मंत्र म्हणताना दोन्ही हात वर करून पितरांना आपली असमर्थता प्रगट करावी. अश्या वेळी काहीजन शंखनाद देखील करतात. याचा सारांश असा कि ज्यांनी आपली पूर्वापार परंपरा अविच्छिन्न ठेऊन ती चांगल्या प्रकारे जोपासण्यात हातभार लावला त्या पूर्वजांच्या रुनांचे व्यक्त करण्याच्या हेतूने निदान त्यांच्या निधन तिथींना स्मरण करावे व कृतज्ञता व्यक्त करावी.
श्राद्धा बद्दल प्रश्न! बद्रिकेदार, मातृगया, पितृग्या, पुष्करतीर्थ ईत्यादि ठिकाणी श्राद्ध केल्यावर तेथील पुरोहित, ”आता यापुढे तुम्हाला श्राद्ध करण्याची गरज नाही” असे आवर्जून सांगताना आढळतात. त्यस शास्त्राधार आहे काय? उत्तर:- बहुतेक तीर्थ क्षेत्रांवरील पुरोहित आपल्यायजमानां कडून श्राद्ध करून घेतल्या नंतर त्या तीर्थक्षेत्राचे महत्व पटवून देण्या करीता पुन्हा तुंहाला कोणतीही श्राद्धे करण्याची आवश्यकता नाही असे सांगतात.वास्तविक यजमानांचा लक्षात यावयास हवे कि, ते अतिशयोक्ती पूर्ण गौर्वोद्गार असतात. एखादे आवडते पकवान पोटभर खायला मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीच्या तोंडून सहज उद्गार निघतात. ”आता चार दिवस मुळीच जेवायला नको” पण त्याचे उद्गार शब्दत: घ्यायचे नसतात. तो व्यक्ती खरचं चार दिवस जेवणार नाहीत काय? त्याच प्रमाणे श्राद्ध हे पितरांच्या तृप्ती साठी करणे आवश्यक आहे. तसे श्राद्ध कर्त्याचे पितृविषयक कर्तव्य म्हणूनही करणे तितकेच आवश्यक आहे. या पैकी दुसरे कारण जास्त महत्वाचे आहे. कारण कर्तव्यच्युत व्यक्ती ईहपरलोकी परमदुर्दैवी ठरते. त्यामुळे कोणत्याही तीर्थांवर कितिही मोठ्या पर्वकाळात श्राद्धे केली तरी त्यामुळे पुढे श्राद्धविराम होऊच शकत नाही हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. कारण श्राद्ध विरामा बाबत कुठल्याही शास्त्रांत उल्लेख केलेला नाही. असे कल्यास हे शास्त्रविरुद्ध ठरते. श्राद्ध विधी चालविणार्या पुरोहितास श्राद्धाचे प्रकार, श्राद्ध देवता, व देव यांची नावे एकदिष्ट व पार्वण श्राद्ध,द्वारलोप ईत्यादी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. श्राद्ध दिनी यजमानाने श्मश्रू (दाढी)व अभ्यंग स्नान करू नये, साधे स्नान करावे रात्री भोजन करू नयेत, ब्रम्हचर्य पाळावे (रात्री एकश्य्या करू नये) तसेच गुरुजींनीही अभ्यंग स्नान करू नये रात्री भोजन घेऊ नये, व ब्रम्हचर्य पाळावे आणि पुरोहिताने किंवा गुरुजींनि संकल्प करून ”ओम भू र्भू व:स्व: ” या व्याहतींनि असा त्रिपादगायत्रीचा किमान एक हजार जप करावा सर्वच कार्यांची दक्षिणा आणि त्यातल्या त्यात श्राद्धाची दक्षिणा तळ हाताच्या मध्यभागी असलेल्या अग्नितीर्थावर घ्यावी. म्हणजे त्यामुळे प्रतीग्रहाचे दोष कमी होण्यास मदत होते.
* श्राद्धासाठी देण्यात येणारी दक्षिणा ठरविताना भोजन पात्रास किती खर्च येतो त्याप्रमाणे द्यावी, ब्राम्हण जर वाहनाने आले असतील तर त्याना वाहन खर्च द्यावा. यजमानांनी दुप्पट दक्षिणा द्यावी व ब्राम्हणांनी दुप्पट प्रायश्र्चित्त घ्यावे.
Like this:
Like Loading...
Related
2 Comments. Leave new
HEY KARYA ATISHAY MAHTWACHE AAHE , ANI YATHASHAKTI HEY KARYA NA VISARTA KARAWE
Agadi Barobar..