भारतातील राजकारण्यांनी लोकसभेचा आणि विधानसभेचा उपयोग जनतेचा हितासाठी न केल्याने जन समाजाचे प्रश्न तसेच राहिले. त्या विपरीत परिणाम होवून देशात नक्षलवादास सुरवात झाली. आज गुरुवारी येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णा बोलत होते. लोकपाल व लोकयुक्ता बिलाला समर्थन मिळण्यासाठी ते सध्या राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. अण्णा पुढे म्हणाले, देश्याच्या तिजोरीत भ्रष्टाचार वळवीसारखा चिकटला आहे. शाशनाच्या तिजोरी जमा होणारा जनतेचा पैसा लोकसभेत व विधानसभेत काही दरोडेखोर लुटून नेत आहेत.
टीम अन्नामधील त्यांचे सहकारी केजरीलाल व किरण बेदी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्तीत केले असता अण्णा म्हणाले, केजरीलाल व बेदीच्या भ्रष्टाचारचा एक जरी पुरावा मला सापडला तर मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सोडून देईल.
1 Comment. Leave new
kam kami ani tika jast…………….. kay honar ya deshach…. dev jane…