सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Sir M. Vishweshwaraiya)




vishweshwaraya
vishweshwaraya

 

थोर स्थापत्यशास्त्रज्ञ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
जन्म-१५ सप्टेंबर १८६१
मृत्यू-१४ एप्रिल १९६२

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६२ साली झाला.त्यांची मुंबई विध्यापीठाची एल . सी. ई. ही पदवी घेतली होती व १८८४ साली बांधकाम  खा त्यात नौकरी स्वीकारली. त्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारून म्हैसून संस्थानात स्थापत्यशास्त्र सल्लागार म्हणून काही वर्ष दिवानपद भूषवले.
म्हैसूनपासून १२ मैलावर कृष्णराजसागर हे प्रचंड धरण बांधणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या आज आपल्यात नाहीत. हे धरण दीड मैलांहून लांब. ११० फुट रुंद व १४० फुट खोल आहे. १४०० फुट खोल आहेत. ते दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे आपोआप उघडतात. डाव्या बाजूला काढलेल्या विश्वेश्वरैय्या कालव्यांसाठी डोंगर खोदून सुमारे चार हजार फुट लांबीचा बोगदा आहे. धरणाजवळ अतिसुंदर वृंदावन आहे. याशिवाय हैद्राबादच्या मुसा नदीला काबूत ठेवू न शहराचा धोका त्यांनी टाळला आहे. खडकवासला  धरणाला लागलेले पाण्याच्या पातळीप्रमाणे उघडणारे व बंद होणारे कळसूत्री दरवाजेही त्यांचीच कल्पकतेने प्रथम तयार केले. या त्यांच्या कल्पनेचा पनामा कालव्यातही उपयोग करण्यात आला.
भारतातही व महाराष्ट्रातील अनेक जलयोजनांचा आराखडा त्यांनी तयार केला. त्यामुळे कर्नाटकात सिमेंट, कागद, साबण, यांचे कारखाने उघडले गेले. भद्रावती येथे पोलादाचा कारखाना उभारून उकृष्ट प्रतीचे पोलाद निर्माण होऊ लागले.
भारत त्या वेळी पारतंत्र्यात होता. स्थापत्यशास्त्राला इंग्रजांचे पाठबळ नव्हते. तरीही जगातील स्थापत्यशास्त्रज्ञानी तोंडात बोटे घालावीत इतके आश्चर्यजनक काम मोक्षगुंडम यांनी केले. स्वतंत्र भारताने ‘भारतरत्न’ हा किताब देऊन त्यांना सम्मानित केले.
१९२३ सालच्या लखनऊ येथे भरलेल्या विज्ञान परीषदेचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले.
‘कन्स्ट्रक्टिंग इंडिया’ व ‘लॉड इकॉनोमी ऑफ इंडिया’ हे त्यांचे ग्रंथही व्यासंगपूर्ण अधयनावर आधारलेले आहे. १४ एप्रिल १९६२ रोजी साली त्यांचे वृद्ध पकाळामुळे निधन झाले.

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
131211




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड