राजमाता जिजाबाई(Jijabai)




jijabai
jijabai

 

       राजमाता जिजाबाई

            जन्म-१२ जानेवारी १५९८

          मृत्यू-       जून –   १६६४

  स्वतः च्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रीया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली अशी भाग्यवती एक राजमाता जिजाबाईच श्री. छत्रपतींची माता.

जिजाबाई ही सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या. शिंदखेडचे जाधवराव निजामशहाच्या पदरी मोठे मातब्बर सरदार होते. तर वेरूलचे मालोजी भोसले यांचा शहाजी राजांचा मुलगा हा अतिशय तल्लख दिसणारा मुलगा. जीजाईच्या मनात लहानपणीचा शहाजी भरून राहिलेला. पण मालोजी व लखुजी जाधवांचे वैर. परंतु खुद्ध निजामशहानंच जाधवरावाला ही सोयरिक करण्यास सांगितलं व लग्न थाठात झाले.

जिजाबाई फारच समजूतदार. लग्नानंतर मुलगी माहेरची नसतेच, तिच खरं घर तिचं सासरंच असायला हवं, हे जाणून तिने जन्माला माहेरचा विरोध पत्करला.

जिजाबाई पोटी १६२७ साली शिवाजीचा जन्म शिवनेरीवर झाला. शिवरायांनी जिजाबाई व शिवबा यांना पुण्याच्या जहागिरीमध्ये पाठवले व दादाजी कोंडदेव आपले विश्वासू व सज्जन कारभारी त्यांच्या बरोबर दिला.

शिवाजी या लहानच, पण या क्षणापासून दोन उत्तम गुरु त्याला लाभले. एक दादाजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु प्रत्यक्ष माता जिजाबाई!

माता जिजाबाईचं कर्तृव्य फार थोड म्हटलं पाहिजे शिवाजीच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे जिजाऊंनी कठीण काम केलं महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलाला रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते.

यवनांचा उच्छेद करून आपण्याच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजीने चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले घेतले आणि १९७४ साली शिवाजी छत्रपती झाले ! जिजाबाईंच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वत्रंत्र राज्य व्हावं’ ही तिच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. आता जिजाबाईला थकवा आला वय ८० वर्षाच होत आलेलं राज्यारोहणाचा सोहळा डोळ्य़ाभर पाहिल्यानंतर पंधराच दिवसांनी १६७४ च्या जून महिन्यात राजमाता जिजाबाई स्वर्गवासी झाली. मत कशी असावी याचा एक उच्च आदर्शच त्यांनी आपल्या जीवनात निर्माण केला यात संदेह नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
371




, , ,

2 Comments. Leave new

  • सोमनाथ रामदास गायधनी
    09/24/2018 7:33 AM

    आपण ही माहिती वाचकांपर्यंत पोहचवता चांगला उपक्रम आहे पण , राजमाता जिजाऊ साहेबांचा मृत्यू १६६४ नाही तर १६७४ ला झाला आहे , आपण चुकीची माहिती प्रसारित करत आहात ।

    Reply
  • amol dhasade
    01/15/2017 5:07 AM

    Very interesting story

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड