निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसला जनता आठवते- नरेंद्र मोदी




narendra modi

 निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसला जनता आठवते, मात्र त्यानंतर ते मतदारांना विसरून जातात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. मध्य प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शहादोल येथील सभेत बोलत होते. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने गरीब, आदिवासींना अनेक आश्वासने दिली, मात्र गेल्या ५० वर्षात ती कधीही पूर्ण झाली नाही. मात्र अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय आले, नव्या योजना आखल्या गेल्या, बजेटमध्येही त्यांच्यासाठी खास सुविधा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे जेथे जेथे राज्य आहे, तेथील आदिवासींची अवस्था हलाखीची असल्याचे सांगत, मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासींसाठी मेडिकल आणि इंजिनियरींग कॉलजेस उघडली आणि तरूणांना नवी संधी उपलब्ध करू दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. काँग्रेस गरीबांना मदतीचे आश्वासन देते, पण देशातील गरीबांना भीक नको आहे, तर त्यांना फक्त कामाची संधी हवी असल्याचे ते म्हणाले. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास, ते मातीतूनही सोने पिकवू शकतील, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. जर शरीराचा एखादा भाग दुर्बल असेल, तर ते शरीर कमकुवत ठरवले जाते, तसेच एखाद्या देशातील एक राज्य कमकुवत असेल, तर ते राष्ट्रही कमकुवतच ठरवले जाते असे सांगत भाजपला सर्व गावांचा, राज्यांचा, सर्व जमातींचा संपूर्ण विकास करून राष्ट्राचा विकास करायचा आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने विविध राज्यांत विविध आश्वासने दिली, माझे त्यांना एवढेच सांगणे आहे, जेथे तुमचे सरकार आहे, तेथे तरी आधी ही आश्वासने पूर्ण करून दाखवा, मग दुस-या राज्यांतील लोकांशी बोला. काँग्रेसचे लोक मत मागायला येतात, तेव्हा अभिवादन करताना एक हात हलवतात, पण सत्तेवर आल्यावर दोन्ही हातांनी लुटतात, असे सांगत धोका देणा-या, आपली वचने मोडणा-या काँग्रेसशी तुम्हीही तुमचे नाते तोडा आणि भरपूर मतांनी भाजपला विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी  जनतेला केले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड