ज्या पंध्रवड्यात चंद्राच्या कला पूर्णत्वास पौनरात्री समय मनोल्हादक होतो अश्या शुक्लपक्ष सर्व मंगलकृते करण्यास विशेष प्रशस्त मनिला आहे. मौंजी बंधना करीता कृष्णपक्ष निषिद्धच आहे.तथापि कृष्णपंचमीपर्यंत गौण पक्ष समजून उपनयन करावे, कृष्ण षष्टीपासून उपनयन कृत्य अवश्य व्रज करावे. उपनयना शिवाय ईतर शुभ कृत्ये मात्र कृष्णदशमी पर्यंत करावी. पुढे एकादशी पासून अमावास्येपर्यंत पांच दिवस सर्वथा त्याज्य होत. कारण असे सांगितले आहे की,कृष्ण पक्षातील एकादशी पासून शुक्ल प्रतिपदे पर्यंत श तिथी शुभ कार्यास निंद्य होत त्यातही द्वादशी पासून अमावास्ये पर्यंत चार तिथी विशेष निंद्य होत त्याही पेक्षां चतुर्दशी व अमावस्या ह्या दोन तिथी तर अत्यंतच निंद्य आहेत असे जाणावे.
Source : Marathi Unlimited.











