मुंबई महापालिकेच्या 1331 शाळांमध्ये सध्या साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांची गळती वाढत असल्याचा मनपाचा दावा आहे आणि म्हणूनच ढासळत्या शैक्षणिक दर्जाबरोबरच गळती रोखण्यासाठी मनपाच्या शाळा सेवाभावी संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव पालिका शाळाची गुणवत्ता वाढवण्यासाठीच मंजूर केल्याचा दावा महापौरांनी केला आहे.
Source : News Updates