दीपक केवट (२0) नावाचा भुरटा चोर सुरक्षायंत्रणा भेदून बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यात शिरला. हाताला मिळेल तो ऐवज जमा करून तो आल्या पावली बाहेर पडत होता. इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले आणि जुहू पोलिसांच्या हवाली केले.
या घटनेने बच्चन व त्यांचे कुटुंबीय काही काळ चिंताग्रस्त झाले. तसे दुस्तुरखुद्द अमिताभ यांनीच ब्लॉगद्वारे स्पष्ट केले. दीपकने तिथे (बंगल्यात) पडलेली लूज कॅश चोरली. त्याला अटक झाली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली. बंगल्याभोवती पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पण, सरतेशेवटी काहीच सुरक्षित नसते. जितकी काळजी आपण घेऊ तितका धोकाही वाढतो.
– अमिताभ यांनी ब्लॉगवर
Source : Marathi Updates.












