— योग —




— योग —
yog sadhna
योग हा माणसाला घेरणारा पाप पिंजरा दग्ध करून टाकतो,  योगाचे दोन प्रकार आहे. एक ”अभाव” व दुसरा ” महायोग ” जेव्हा आपण शून्य आहोत आणि सर्व प्रकारच्या गुणांनी रहित आहोत, असे चिंतन केले जाते तेव्हा त्याला ”अभाव” योग म्हणतात, आपला आत्मा आनंद पूर्ण, सर्व पाप रहित आणि परमेश्वराशी अभिन्न आहे, अश्या चिंतनाला ”महायोग”  म्हणतात, योगाने ज्ञान लाभते, ते ज्ञान योग्याला मुक्ती लाभास सहाय्यभूत ठरते. ज्याच्या ठायी योग आणि ज्ञान दोन्ही वसतात, त्याच्या वर भगवान प्रसंन्न असतात. जे दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा, सर्वदा  महायोग करतात त्यांना  देवताच समजा!. या दोन्ही प्रकारच्या योगांच्या सहाय्याने योगी आत्मसाक्षात्कारकरून धेतो, समस्त योगां मध्ये हा योग सर्व श्रेष्ठ आहे.
यम, नियम, आसन, प्राणायांम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी हि राजयोगाची अंगे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांना ”यम” म्हणतात. या यमाने  चित्तशुद्धी होते. कायावाचामनाने कुण्याही प्राण्याला कधीही पिडा न देणे याला अहिंसा म्हणतात, अहिंसेपेक्षा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही, जशे आहे तसेच सांगणे याला ”सत्य” म्हणतात. सर्व काही सत्यात प्रतिष्ठीत आहे.

प्राणायामाची तीन अंगे आहेत, पूरक कुंभक व रेचक, रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे, पूरक म्हणजे श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे श्वास आत धारण करणे व धरून ठेवणे.  ज्या प्राणायामात बारा सेकंद पूरक केला जातो, म्हणजेच वायू आत घेतला जातो तो ”कनिष्ट” प्राणायाम होय, चोवीस सेकंद पूरक केल्यास तो ”मध्यम” प्राणायाम होय आणि  ज्यात बत्तीस सेकंदाचा पूरक असतो त्याला ”उत्तम” प्राणायाम म्हणतात. कनिष्ट प्राणायामात घाम येतो, मध्यम प्राणायामात शरीराला कंप सुटतो. आणि उत्तम प्राणायामात  आसनावरून उत्थान होऊन अतिशय आनंद वाटू लागतो.  वेदामध्ये गायत्री नावाचा अतिशुद्ध व पवित्र असा मंत्र आहे, त्याचा भावार्थ असा आहे ” या विश्वाला जन्म देणाऱ्या  त्या ज्योतिर्मय परम पुरुष्याच्या महिम्याचे आम्ही ध्यान करतो तो आमच्या बुद्धीत, ज्ञानात, विकास करो! या मंत्राच्या प्रारंभी आणि शेवटी “ओम” जोडलेला असतो, एका  प्राणायामात गायत्री मंत्र तीनदा मनातल्या मनात उच्चारावा .

ह्दय पदमावर, मस्तकाच्या मध्य भागावर,  देहांतर्गत अन्य एखाद्या स्थानावर मन केन्द्रीत करण्याला ”धारणा” म्हणतात. मन एका स्थानाशी संलग्न करून, त्यात एका स्थानाचा अवलंब करून विशिष्ट वस्तूचा प्रवाह सुरु केला; अन्य प्रकारच्या वृतीचा उद्भवून जेणे करून या आधीच्या प्रवाहाला नष्ट करणार नाही असा प्रयत्न करीत गेल्याने  तो आधीचावृत्ती प्रवाह हळू हळू प्रबळ झाला आणि अन्य वृत्ती प्रवाह क्षीण होत होत अखेर अजिबात नाहीसा झाला, त्यानंतर ह्या आधीच्या वरतीही शमुन अंती मनात फक्त  एकच वृत्ती उरली ह्यालाच ” ध्यान” म्हणतात, ज्यावेळी या अवलंबनाचीहि काही गरज उरत नाही, समस्त मन ज्या वेळी एकाच लाटेसारखे होऊन जाते, त्या वेळी मनाच्या त्या  एकरूपतेलाच ”समाधी” म्हणतात. जर मनाला एखाद्या स्थानावर बारा सेकंद केंद्रित करता आले तर ती एक धारणा झाली, हि धारणा बारा पट झाली कि एक “ध्यान” होते.  आणि हे ध्यान बारा पट झाले कि  एक “समाधी “होते.
Source : Marathi Unlimited Articles Section. .
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड