stri-janm-mhanawuni Dhairya, Dharm, Mitra aur Striinn charo ki vipatti ke samay hi pariksha (Meaning: Stri janam se hi apavitra hai kintu pati ki seva karke wah …
प्रगतीशील देश म्हणायला फार छान वाटते. याच देशात स्री प्रतेक कार्य्र क्षेत्रात उच्च पदावर पोचली आहे. तरी स्री संबधीतील मानसिकता बदलेली नाही. याच नवल वाटते. आज आपल्या समोर कितीतरी मराठी पुस्तके अनुवादित झाली आहे. बुरख्या आडच तीच स्री जीवन अनेक अन्याय मर्यादाना आणि शोशनांना बळी ठरलेलं आहे कधी हुंडा बळी, कधी- वैधव्य, संशयापोटी आतल्या आत चिरडून मारल्या जाने. तर कधी कुटुंबा कडून थळल्या जाने, तर दारू-जुगारी पती असे कित्येक कार्नांद्वारे स्री ची अप्रतीष्ठा, उपेक्षा आणि अवनती अजूनही संपलेली नाही. स्रीच्या जगण्याच अस अवमूल्यन संस्कृतीच्या दीर्घ प्रवासात किती काळा पासूनच चालू आहे संतमंडळीत वावरणारी कणखर बाई म्हणजेच जनाबाई बाल वयापासून कष्टाना न घाबरणारी, आणि आंतरअनुभवाच्या बळावर विठठलाला सर्व नात्यांनी बांधून घेणारी. ” विठ्या अरे विठ्या, मुल मायेच्या कार्ट्या!’ अश्या शब्दात विठोबाशी संवाद साधणारी एकमेव जनाबाई. किती अफाट ताकत आणि लौकिक, अलौकिकहि. एकदा जनाबाई ने बाईपणाचा अनुभव उदास करण्याचा असल्याच म्हणवून दाखवील तेव्हा संतांनी त्यांची ही उदासी मिटविली. हे वास्तव्य आता भूत काळात जमा झाल आहे. अस आपल्याला पुष्कळदा वाटत. ईकडे एकीकडे महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रीचा पुढाकारही आपल्याला सुखावतो, तिच्या प्रगतीच्या, तीन घेतलेल्या भरारीच्या, तिला उपलब्ध असलेल्या संधी, दिशा सुविधा यांच्या आणि तीउप्भोगत असलेल्या काही अंशी गैर वापर करत स्वात्नत्र्याच्या बातम्यांनी आपली वृत्तपत्र, वाहिन्या, मंन आणि जीवन भरून जात असतात.फार पूर्वीच्या काळी सावित्रीच्या बापाने तपश्चर्या करून देवाला मुलीची मागणी घातली व देवाने ती पूर्ण केली. सावित्री म्हणजे लक्ष्मीच रूप शुभदा, कल्याणी, समृघी, सर्जनशीलता, असलेली तेजस्वी सर्व गुण संपन्न अशी मुलगी प्राप्त झाली. पण तरी लग्न काळी मोठमोठ्या धैर्यवान राजपुत्रांना तिला मागणी घालण्याच घैर्य नव्हते अश्या वेळी तिला स्व:त चा वर निवडण्याच स्वातंत्र्य वडिलान कडून मिळाले. पण वर शोघल्या नंतर तो अल्पायुषी असल्याच माहिती होवूनही आपल्या निर्णयावर अटळ राहून त्याच वरा सोबत लग्न केल व पूर्णता निभावली. केवढ हे धैर्य अश्याच कितीतरी स्त्रीया विकासाचा झेंडा फडकवून शिखरावर पोहोचल्या आहेत.
ग्रामीण भागातही आता बाईचा चेहरा बदलेला आहे. मुलामुलींना बाहेर गावी शिक्षण घेण्या करिता. पाठवून मोठ्या पदावर पोहोचविले आहे. त्या सुद्धामुलीच्या जन्मान खंतावत नाही. बाई असण्याच दु:ख मुळीच नाही. आरोग्य सेवा तसेच बचत गट या माघ्यमातून त्या पुढे जात आहे. स्व:त च्या मिळकतीवर घरसंसार कश्या प्रकारे करायचा हा प्रश्न मिटवून टाकला आहे. स्त्रीला पूर्वी वांझ पणाच्या अत्याचाराला बळी पडावे लागायचे. तेव्हा आता आधुनिक तंत्र ज्ञानाच्या प्रयोगद्वारे त्यातूनही तिचा प्रश्न सोडविल्या जावू शकतो. तेव्हा पुरातन काळातील सावित्रीच्या आख्या नातील तिच्या वडिलांची तपश्चर्या सार्थ झालीच. तेव्हा या काळातही ती सर्वतोपरी साघ्य होवू शकते म्हणूनच म्हणावेसे वाटते माणसाचे मुल-ते-माणसाचेच मुलगी असो-वा-मुलगा स्वीकार व्हायलाच हवा.











