होता कधीतरी आर्यावर्त आसेतु हिमाचल
कैकेय गांधार तिबेट सहित पौर्वात्य भूस्थल ।
सुजलाम सुफलाम धर्मरक्षित सर्वांप्रती भद्र
सुवर्ण धुम्र ठायी ठायी न दिसे कुणी द्लीद्र ।।१।।
घातला घाला यवनांनी दाऊनि अति कापट्य
त्यामाजी भर पडली सद्गुण विकृतिचिये नाट्य
पन्न गांशी दिले दुग्ध प्राशावया जे जाहले गरळ
आमुचीच माणसे स्वहितार्थ ठरली कुटील खळ ।।२।।
फितुरीचे तया योग्य बक्षीस यवनांनी दिधले
धर्म भ्रष्ट होऊनी यवनांनी स्वकन्यारत्न अर्पिले
कुटारीचा दांडा जसा होई आपुलिया गोता काळ
धर्मभ्रष्टां कारणे नासला धर्म, घटले हिंदू संख्या बळ ।।३।।
ईतिहास जमा जाहला तो काळ वैभवशाली
सुबत्तता, चैतन्य येईल का परतुनी पुन्हा कधी काळी ?
गत वैभवाच्या सुखद स्मृती क्षणोक्षणी करी बेचैन
तथापि क्षिती कराया आहे असा खंबीर तो कोण ?।।४।।
पुनवेच्या शशांका पीडा होऊनी त्याजला होतसे क्षय
हिंदूराष्ट्र पिडीत जाहले, चंद्रासम भूभाग नसे अक्षय
आम्ही राहू अथवा न राहू पहावया तो हेमवती काळ
भगवे निशाण भूमाते ! फडकू दे गतऐश्वर्यावरी एकवेळ ।।५।।