वाघाची हत्या अवघ्या ५0 रूपयात होते. हे सांगूनही खरे वाटणार नाही. पण वाघाला जाळ्य़ात पकडण्यासाठी लावण्यात येणार्या ट्रॅपचा खर्च एवढाच आहे. फरक आहे, फक्त सापला लावण्याच्या पध्दतीचा. गेल्या दीड वर्षांत अशा पध्दतीने १९ वाघांना संपविण्यात आले.यापैकी सात वाघ शिकार्यांच्या ट्रॅपमध्ये फसून मृत्यूच्या दाढेत सापडले.वाघांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ख्याती. या जिल्ह्याच्या जंगलातील वातावरण पट्टेदार वाघांसाठी पोषक असले तरी शिकारी टोळ्यांचे ट्रॅप जंगलातील राजांच्या जीवावर उठले आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत चार वाघांचा मृत्यू झाला. यापैकी तीन वाघ शिकार्यांनी संपविले आहेत.
Source : Online